माण तालुक्यात ६० घरांची पडझड ८० हेक्टरला फटका   

सातारा,(प्रतिनिधी) : माण तालुक्यात वळीवाच्या पावसामुळे ६० पेक्षा जास्त घरांची पडझड तर ८० हेक्टरवरील शेती बाधित झाली आहे. शेतातील टोमॅटो, आंबा, डाळींब, कांदा, भुईमूग, मका या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पंचनाम्याला सुरूवात झाली असली तरी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लवकरात लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
 
गेल्या आठवडाभरात तालुक्यात तब्बल २५८ मिमीपावसाची नोंद झाली आहे. इतिहासात प्रथमच इतका मोठा पाऊस झाला आहे. पावसामुळे श्रीपालवनमध्ये ६ घरांची पडझड झाली. अंगणवाडीत पाणी शिरल्याने मुलांचा खाऊ व इतर साहित्य भिजले. तालुक्यात टोमॅटो, आंबा, डाळींब, कांदा ही नगदी पिके घेतली जातात. मात्र, उन्हाळ्यात पाऊस झाल्याने या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस उघडल्यानंतर पंचनामे सुरू झाले आहेत. पण प्रत्यक्षात नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यालाचार मंत्रिपदे मिळाली आहेत. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आंधळी, रानंद, गंगोती लोधवडे हे तलाव पावसाने भरले असल्याने आहेत. तर मासाळवाडी, महाबळेश्वरवाडी, जाशी हे व आणखी काही मध्यम प्रकल्प तलाव अद्यापही कोरडे असून काही दिवसात तेही भरतील, अशी परिस्थिती आहे.
 

Related Articles